देशात आधीपासूनच बीएमडब्ल्यू, हुंडई, टोयोटा यासारख्या कंपन्यांच्या दर्जेदार गाड्या आहेत. इतकेच नाही तर टाटा आणि महिंद्रासारख्या देशी कंपन्या संशोधन आणि विकासकामात मग्न आहेत. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत विजेवर चालणाऱ्या गाड्या आणल्या जात आहेत. या कंपन्यांनी इथेनॉल व हरित इंधनावर चालणाऱ्या गाड्या आणण्याचा इरादाही जाहीर केलेला आहे. वाहन कंपन्या फ्लेक्स इंजिनवर काम करीत आहेत. इथेनॉलमुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे. सर्व क्षेत्रात रोजगार निर्मिती व्हावी, हा आमचा उद्देश आहे, असेही गडकरी यांनी सांगितले.