वर्धा, पुढारी वृत्तसेवा : आषाढीनिमित्त मोठ्या संख्येने भाविक पंढरपूरला जातात. भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेच्या वतीने विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. 'पंढरपूर आषाढी एकादशी' विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे नागपूर-मिरज-नागपूर दरम्यान ‘पंढरपूर आषाढी एकादशी’ विशेष गाड्या चालवणार आहे. या गाड्यांना वर्धा, पुलगाव येथेही थांबा देण्यात आला आहे.
नागपूर-मिरज विशेष (2 सेवा) ट्रेन क्रमांक 01205 विशेष ट्रेन 14 जुलै रोजी नागपूरहून 8.50 वाजता सुटेल आणि मिरजेत दुसर्या दिवशी 11.55 वाजता पोहोचेल. तर दुसरी गाडी ट्रेन क्रमांक 01206 विशेष गाडी मिरजहून 18 जुलै रोजी 12.55 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी 12.25 वाजता नागपूरला पोहोचेल. नागपूर-मिरज विशेष (2 सेवा) गाडी क्रमांक 01207 विशेष नागपूरहून 15 जुलै रोजी 8.50 वाजता सुटेल आणि मिरज दुसर्या दिवशी 11.55 वाजता पोहोचेल. ट्रेन क्रमांक 01208 विशेष गाडी मिरज येथून 19 जुलै रोजी 12.55 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी 12.25 वाजता नागपूरला पोहोचेल.
या गाड्यांना अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी, पंढरपूर, सांगोला, म्हसाबा डोंगरगाव, जठरगाव धालगाव, कवठेमहांकाळ व सुलगरे, आरग येथे थांबे देण्यात आले आहेत.