Nagpur news: ‘मागितली भाकरी, दिली चटणी; महायुती सरकारच्या तुटपुंज्या मदतीवर विजय वडेट्टीवार यांचा संताप

Vijay Wadettiwar latest news: सरकारकडे नको असलेल्या गोष्टींसाठी पैसे आहेत, मात्र शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तिजोरीतील खडखडाट आठवतो; अशी टिका देखील वडेट्टीवार यांनी केली आहे.
Nagpur news
Published on
Updated on

नागपूर: महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत अपुरी आणि तुटपुंजी असून, 'मागितली भाकरी, दिली चटणी' अशा शब्दांत काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाड्याच्या दौऱ्यावर असतानाच वडेट्टीवार यांनी बुधवारी (दि.२४) नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना ही तीव्र नाराजी व्यक्त केली.

सरकारकडे नको असलेल्या गोष्टींसाठी पैसे आहेत, मात्र शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तिजोरीतील खडखडाट आठवतो. जाहिरातींसाठी कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या सरकारला संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी नियम आणि निकष आठवतात, असा आरोपही त्यांनी केला. या पावसामुळे मराठवाड्यातील शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झाला असून, हातातून पीक तर गेलेच, पण जमिनीचेही मोठे नुकसान झाले आहे. पीक विमा कंपन्यांनी मोठा नफा कमावला, मात्र शेतकऱ्यांची माती झाली आहे, असेही ते म्हणाले. सरकारने कर्जमाफी न दिल्याने शेतकरी आधीच संकटात होता आणि आता या पावसामुळे तो पूर्णपणे संपून गेला आहे.

वडेट्टीवार यांनी सरकारला तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून, सर्व शेतकऱ्यांना निकषांपलिकडे जाऊन मदत देण्याची मागणी केली आहे. सरकार याबाबत काय निर्णय घेणार, याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news