

नागपूर : 'एक है तो सेफ है...!' मुळेच दिल्ली विधानसभेतही मोठा विजय भाजपला मिळाला, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी हा विकास आणि सुशासनाच्या दिशेने भाजपला मिळालेला कौल असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात बहुमुखी विकासावर जनतेने शिक्कामोर्तब केले. या निवडणुकीत काँग्रेसला भोपळा फोडता आला नाही तर आपचे नेते माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया यांच्यासह अनेक दिग्गज पराभूत झाले. भाजपच्या या अभूतपूर्व बहु प्रतिक्षित विजयानंतर उपराजधानी नागपुरात शहर भाजप कार्यालय, विभागीय कार्यालय येथे कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष साजरा केला. ढोलताशांच्या गजरात महिला पदाधिकाऱ्यांनी फुगडी खेळत, पेढे, लाडू भरवित आनंदोत्सव साजरा केला.