Nagpur Politics : युद्ध थांबले पण काँग्रेसने भाजपला घेरले!

Atul Londhe : पंतप्रधानांनी ट्रम्पला रोखठोक उत्तर का दिले नाही; काँग्रेसचा सवाल
Congress |
काँग्रेस पक्ष File Photo
Published on
Updated on

नागपूर : राष्ट्रीय आपत्तीमुळे पक्ष-विपक्ष विसरून सर्वजण एकत्र आलो. पण ज्यावेळी पाकिस्तानने युद्ध थांबविण्याची विनंती केली. त्यावेळी ज्यांनी संसदेसह इतर ठिकाणावर हल्ले केले, अशा लोकांचे प्रत्यार्पण पाकिस्तानकडून का मागितले नाही? असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उपस्थित केला. भाजप सरकारने सर्व पक्षांची बैठक बोलवावी. त्यामध्ये पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित रहावे. यावेळी सेनेचे अभिनंदन करून या विषयावर चर्चा करावी, असेही ते म्हणाले.

Congress |
India Pakistan Conflict | पाकच्या हिटलिस्टवर दिल्ली: नागपूरला देशाची पर्यायी राजधानी करा; काँग्रेस नेत्याची मागणी

पंतप्रधानांनी दहशतवाद्यांना आमच्या ताब्यात दिल्याशिवाय आम्ही युद्ध थांबवणार नाही, असे का ठणकावले नाही. भारताने ही संधी सोडल्याचे स्पष्ट दिसत आहे. पाकिस्तान आणि काश्मीरचा द्विपक्षीय प्रश्न आहे. यात तिसऱ्याचा हस्तक्षेप आम्ही कधीच मान्य करणार नाही, असा स्पष्ट करार झाला आहे. ट्रम्प यांनी धमकी दिली, तुम्ही युद्ध थांबवलं नाही तर मी तुमच्या सोबतचे व्यापार बंद करेन. या त्यांच्या धमकीला पंतप्रधानांनी रोखठोक उत्तर दिले असते तर चांगले झाले असते असेही ते यावेळी म्हणाले.

Congress |
Pahalgam Terror Attack | ५ लाख पाकिस्तानी मुलींनी केले भारतीयांशी लग्‍न, भाजप खासदार निशीकांत दुबेंचा दावा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news