Vidarbha : वेगळा विदर्भ मागणीसाठी नागपूर कराराची होळी 

Vidarbha : वेगळा विदर्भ मागणीसाठी नागपूर कराराची होळी 
Published on
Updated on
नागपूर; पुढारी वृत्तसेवा : वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने नागपूर कराराची होळी करत नागपूरच्या व्हेरायटी चौकात आंदोलन केले. गेली 11 वर्षे हे आंदोलन सुरू असून लेके रहेगे, विदर्भ राज लेके रहेगे.. विदर्भ आमच्या हक्काचा अशा घोषणा देत केंद्र  शासनाचा निषेध करण्यात आला.
1953 साली विदर्भ जेव्हा महाराष्ट्रात सामील झाला, त्यावेळी नागपूर करार करण्यात आला होता. त्यात विदर्भाच्या विकासाचा महत्वाचा मुद्दा होता. लोकसंख्येच्या तुलनेत 23 टक्के सर्वच क्षेत्रात आम्हाला वाटा दिला जाणार होता मात्र, विदर्भावर सातत्याने सिंचन, रस्ते, प्रकल्प याबाबत नियमित अन्याय होऊन वेगळ्या विदर्भाचा वाद वाढत गेला. तीन राज्ये दिली पण विदर्भ राज्य डावलले गेले. विदर्भात वीज निर्माण होते. मात्र, सगळ्यात महाग वीज विदर्भाला मिळते, रोजगार नाही, शेतकरी आत्महत्या वाढत आहे, भकास विदर्भ झाला आहे त्यामुळे आम्हाला आता महाराष्ट्रात राहायचं नाही, आम्हाला आमचे हक्काचे  वेगळं विदर्भ राज्य द्या अशी मागणी यावेळी पूर्व विदर्भ प्रमुख अरुण केदार यांनी माध्यमांशी बोलताना केली. व्हेरायटी चौकातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेसमोर गुरुवार नागपूर कराराची होळी करण्यात आली.
यावेळो माजी आमदार ऍड वामनराव चटप,  अरुण केदार, अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती, विदर्भ युवा आघाडी प्रमुख मुकेश मासुरकर, महिला आघाडी प्रमुख रंजना मामर्डे, ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर कोंडबतुनवार, गणेश शाहू आदीनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. मोठ्या संख्येने यावेळी स्त्री-पुरुष विदर्भवादी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news