गेट वे ऑफ इंडिया, बोट दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू - अजित पवार

Maharashtra Assembly Polls
गेट वे ऑफ इंडिया, बोट दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू - अजित पवारFile Photo
Published on
Updated on

नागपूर: गेटवे ऑफ इंडिया परिसरात झालेल्या बोट दुर्घटनेत ही घटना घडली. त्यावेळी या बोट मध्ये 110 प्रवासी होते. 96 प्रवासी सुरक्षित असून 13 जणांचा मृत्यू झाला. यात नौदलाचे तीन तर दहा नागरिक आहेत अशी माहिती नौदलाच्या वतीने व्हाईस ऍडमिरल संजय जगजीत सिंग यांनी दिल्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी विधानसभेत सांगितले.

आजच्या कामकाजात यासंदर्भात विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. याबाबतीत ते निवेदन करीत होते. मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपये वर्तकांच्या वारसांना दिले जाणार आहेत. गंभीर तीन जखमी मध्ये नौदलाचे कर्मचारी आहेत तर एक आठ महिन्यांची गरोदर महिला तर तीन वर्षाची मुलगी असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.

नौदलाचा स्पीड बोट चालक व इतर जबाबदार लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत चौकशी सुरू असेल. 11 क्राफ्ट आणि चार हेलिकॉप्टरच्या मदतीने शोध कार्य दुसऱ्या दिवशीही सुरूच असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news