20 मार्च रोजी दुपारी 3.30 वा. रॅडिसन ब्लु हॉटेलमध्ये सामाजिक तथा अध्यात्मिक नेत्या माता अमृतानंदमयी यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत या परिषदेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी नोबेल विजेते कैलास सत्यार्थी, भारतीय सांस्कृतिक अनुसंधान परिषद अध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे, अह महफुचान, सी 20 शेरपा इंडोनेशिया, राजदूत विजय नांबियार सिव्हील इंडिया शेरपा राजदूत अभय ठाकूर आदी उपस्थित राहतील.'नागरी संस्थांची शाश्वत विकासातील भूमिका, जगभरातील स्वयंसेवी संस्थांसमोरील आव्हाने व त्यावरील उपाय' बाबत या परिषदेत चर्चा व मंथन होणार आहे. सलग दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेच्या समारोपास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहतील.