नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविला आहे. दुसरीकडे रोज दुपारी 12 नंतर उन्हाच्या झळा असह्य होत आहेत. उष्माघाताच्या घटना वाढल्याने शहरातील अनेक चौकातील सिग्नल्स दुपारच्या वेळी वाहतूक पोलिसांनी बंद केले आहेत. आज विदर्भातील इतर जिल्ह्यांच्या तापमानाचा विचार करता अकोला 41.8, गडचिरोली (41.8), वाशीम (40.6), बुलडाणा (37.8), गोंदिया (41.5) याप्रमाणे तापमानाची नोंद झाली. ढगाळ वातावरण, पावसाच्या हजेरीने विदर्भात काहीसे तापमान कमी झाल्याचे अनुभवास येत आहे. दरम्यान, अधूनमधून पावसाच्या हजेरीमुळे लग्न, स्वागत समारंभात वऱ्हाडी मंडळींची तारांबळ उडते आहे. वारंवार वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण वाढले असून उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत.