राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राजीनामा देण्याचे कारण मला माहित नाही,परंतु त्यांनी अत्यंत चुकीचा निर्णय घेतला. त्यांना शुभेच्छा देत त्यांनी स्वत: पक्ष सोडण्याच्या सुरू असलेल्या चर्चा ह्या वावड्या असल्याचे म्हटले आहे. मिडीयामध्ये छापून आलेली माहिती ही अत्यंत चूकीची आहे. मी पक्षाचा बुथलेवला काम करणारा कार्यकर्ता असल्याचे म्हटले आहे. त्यांनी आपला मतदार संघ, जिल्ह्यातील नागरिकांना, आपण काँग्रेसचा सच्चा शिपाई असल्याचे सांगितले आहे. ते पुढे म्हणाले, इंदिरा गांधी, राजीव गांधी व आताचे नेते राहुल गांधी आणि देशाचे काँग्रसचे अध्यक्ष खर्गे तसेच राज्याचे नेते नाना पटोले, विजय वड्डेटीवार यांच्या विश्वासावर काम करीत आहो. त्यामुळे काँग्रेस सोडण्याचा विषय येऊच शक्त नाही. मी कधी काँग्रेस सोडली नाही आणि सोडणार नाही असे स्पष्ट करून पक्ष सोडण्याच्या वावड्यांना पूर्ण विराम लावला आहे.