चंद्रपूर : चिचपल्लीचा तलाव फुटला; जनावरे वाहून गेली, ८० शेळ्यांचा मृत्यू

पाणी गावात शिरले; २०० कुटुंबांचे नुकसान
The lake at Chichapalli burst
चिचपल्ली येथील तलाव फुटल्याने नागरिकांचे नुकसान झाले.Pudhari News Network

चंद्रपूर : जिल्हात मुसळधार पाऊस सुरू असून चिचपल्ली गावातील लहान तलाव फुटल्याने सुमारे २०० कुटुंबांचे नुकसान झाले आहे. साखर झोपेतच पाणी गावात शिरल्याने नागरिकांना आपले संसार उपयोगी साहित्य वाचविता आले नाही. ७० ते ८० शेळ्यांचा या पुरात मृत्यू झाला असून अनेक जनावरे वाहून गेली आहेत. क्षतीग्रस्त कुटुंबीयांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अन्य नातेवाईकांकडे आश्रयास ठेवण्यात आले आहे.

The lake at Chichapalli burst
उत्तराखंड : केदारनाथ यात्रा मार्गावर दरड कोसळली, भाविक ढिगाऱ्याखाली गाडले; तिघांचा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्याच्या ठिकाणापासून काही अंतरावर चिचपल्ली गाव आहे. या गावाला दोन तलाव आहेत. त्यापैकी एक लहान तलाव म्हणून ओळखला जाणारा तलाव रविवारी (दि.२१) पहाटे साडेचार वाजता फुटला. तलाव फार जुना असल्याने तलावाची पाळ कमकुवत झालेली होती. शिवाय वनविभागाने जंगलात एक बंधारा बांधल्यामुळे या बंधाऱ्याचे पाणी येथील तलावात मोठ्या प्रमाणात येत होते. चिचपल्ली परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे आज पहाटे या तलावाची पाळ फुटली.  तलावाच्या खालच्या बाजूला दोनशे कुंटुब वास्तव्यास असल्याने या गावात तलावाचे पाणी गावात शिरल्याने नागरिकांच्या संसारउपयोगी साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गावात पाण्याची पातळी कमरेच्या वर गेल्यामुळे सुमारे ८० शेळ्यांचा मृत्यू झाला. तर काही जनावरे वाहून गेली.

The lake at Chichapalli burst
Bangladesh quota protests | बांगलादेशात हिंसाचार, आतापर्यंत १०५ जणांचा मृत्यू

२०१० मध्येही फुटला होता लहान तलाव

चिचपल्ली गावात फार जुना असलेला लहान तलाव २०१० सालीही फुटलेला होता. त्यानंतर २०२२ मध्ये हा तलाव फुटू शकतो, अशी शक्यता वर्तवून या तलावाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायतच्या वतीने प्रशासनाला करण्यात आली होती. त्यावेळी तहसीलदार यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन तलावाचे पाहणी केली होती. मात्र त्यानंतर तलावाच्या दुरुस्तीचे भिजत घोंगडे आज कायम आहे.

The lake at Chichapalli burst
Kuwait Fire Accident : केरळमधील एकाच कुटुंबातील चौघांचा भीषण आगीत होरपळून मृत्यू

पिकांचे अतोनात नुकसान

लहान तलाव फुटल्यामुळे चिचपल्ली परिसरातील शेकडो हेक्टर वरील पिके पाण्याखाली गेली आहेत. काही भागात लागवड करण्यात आलेले  कापूस पीक वाहून गेले असून शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news