चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : सार्वत्रिक लोकसभा निवडणुक २०२४ करीता आदर्श आचार संहिता सुरु असून निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर विविध राजकिय पक्षातील उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. प्रचार जोरात सुरू आहे. या काळात सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यास मज्जाव करण्यात आला आहे. सोशल मिडीयावर चंद्रपूर पोलिस करडी नजर ठेवून आहेत. आक्षेपार्ह पोस्ट टाकून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सोशल मिडीया व्हॉटसॲप, फेसबुक, टिव्टर एक्स आदी समाज माध्यमावर विविध प्रकारच्या ऑडीओ,व्हिडीओ व संदेश टाकण्यात येतात आणि त्या पोस्टवर अन्य लोक लाईक व कॉमेन्टस् करुन शेअर करतात. तसेच सोशल मिडीयावर, खोट्या बातम्या प्रसारीत करणारे ऑडीओ,व्हिडीओ व संदेश सोशल मिडीयावर वायरल होत आहे. काही व्यक्ती व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते जाणीवपूर्वक द्वेषबुध्दीने प्रतिपक्ष उमेदवारांच्या वैयक्तिक आणि कुटूंबियांना लक्ष करुन द्विअर्थी आक्षेपार्ह पोष्ट टाकत आहेत, व अश्या पोष्ट ला इतर इसम लाईक व त्यावर आक्षेपार्ह कॉमेन्टस् करुन शेअर करीत आहे.