चंद्रपूर : रवींद्र टोंगे यांची प्रकृती चिंताजनक; मेडिकल कॉलेजमध्ये उपचारांसाठी दाखल | पुढारी

चंद्रपूर : रवींद्र टोंगे यांची प्रकृती चिंताजनक; मेडिकल कॉलेजमध्ये उपचारांसाठी दाखल

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला सरसकट ओबीसीमध्ये समाविष्ट करू नये. यासह विविध मागण्यांकरीता चंद्रपुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलनाला बसलेले राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांची प्रकृती शुक्रवारी (दि.२२) अधिकच खालावली. त्यामुळे त्यांना शासकिय मेडिकल कॉलेजमध्ये उपचारार्थ हलविण्यात आले. त्याच्या ऐवजी ओबीसी युवा महासंघाचे विजय बल्की अन्नत्याग आंदोलनला बसले आहेत.
राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र टोंगे यांनी ११ सप्टेंबर पासून चंद्रपुरात जिल्हाधिकारी कार्यालयासोर अन्नत्याग आंदोलन  सुरू केले आहे. ओबीसी मधून सरसकट मराठ्यांना आरक्षण देऊ नये, बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात जातनिहाय सर्वे व्हावा व ओबीसी मुलामुलींचे वसतीगृह सुरू करून स्वाधार योजना लागू करावी, आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत. आज शुक्रवारी आंदोलनाचा बारावा दिवस आहे. सत्ताधारी व प्रशासनाने आंदोलनाची अद्याप दखल घेतली नाही, त्यामुळे ओबीसी समाजामध्ये प्रचंड संताप व्यक्‍त करण्यात येत आहे. दोन दिवसापूर्वी टोंगे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना  रूग्णालयात उपचारार्थ भरती करण्याचा सल्ला वैद्यकिय विभागाने दिला होता. परंतु उपोषणस्थळीच उपचार करण्याची मागणी केल्याने  रूग्णालयात भरती न करता उपोषणस्थळीच त्यांचेवर उपचार करण्यात आले. आज शुक्रवारी पुन्हा त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने वैद्यकीय विभागाने त्यांच्या प्रकृतीची काळजी घेत. त्यांना उपचारा करीता चंद्रपूर  शासकिय मेडिकल कॉलेज मध्ये दाखल  करण्यात आले.
टोंगेना रुग्णालयात नेल्यानंतर टोंगे यांचे ऐवजी ओबीसी युवा महासंघाचे विजय बल्की उपोषण सुरू केले आहे. काल पदाधिका़-यांनी टोंगेच्या समर्थनार्थ  मुख्यमंत्री वउप मुख्यमंत्र्यांचे मुखवटे लावून आंदोलन केले होते. त्यांच्या मागणीला ओबिसी समाजातून मोठा पांठिंबा मिळत असताना प्रशासन व सत्ताधारी मात्र अद्यापही ओबिसी बांधवाच्या आंदोलनाप्रती गंभीर नसल्याचे पहायल मिळत्‍ आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणा-या जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सत्ताधा-यांसह विरोधी राजकिय पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली.
उपोषणकर्ते रवींद्र टोंगे यांची १२ व्या दिवशी प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर शासकिय मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहे. टोंगें यांच्या जीवाचे काही वाईट झाल्यास संपूर्ण राज्यात उद्रेक होईल, असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाने दिला आहे. सरकारकडे ओबीसींचे ७२ वसतीगृह सुरु करण्यासाठी पैसे नाहीत ही शोकांतिका आहे. आम्ही या सरकारचा निषेध करित असल्याचे ओबीसी महासंघांच्या पदाधिका-यांनी सांगितले. जोपर्यंत सरकार आमची दाखल घेत नाही, तोपर्यंत आंदोलनाची धग कायम राहील, असे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

हेही वाचलंत का?

Back to top button