आज (दि. २२) सायंकाळी वर्धा नदीच्या पाण्यात वाढ झाल्याने गोंडपिपरी तालुक्यातील विरूर स्टेशन ते गोंडपिपरी मार्गावरील धानोरा आर्वी जवळील वर्धा नदीचे पुल पाण्याखाली आल्याने मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे गोंडपिपरी तालुक्यातील पाचगाव, तोहोगाव, वेजागव, लाठी सरांडी, वामनपल्ली, सकमूर, धाबा गावाचा तालुका व जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे. गडचांदूर ते चंद्रपूर मार्गावरील भोयेगाव पूलावर २१ जुलैच्या रात्री आठ वाजल्यापासून पाणी चढल्याने हा मार्ग अद्याप बंद आहे.