नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचा निकाल सुप्रीम कोर्टाकडून अद्याप यायचा आहे. देशातील कोट्यावधी लोकांचा विश्वास सुप्रीम कोर्टावर आहे. मात्र, नवनीत राणा आणि रवी राणा हे दोघे अशा मेळाव्यातून बोलताना निकाल त्यांच्याच बाजूने लागेल या अविर्भावात दिसून आहेत. निकाल त्यांच्याच बाजूने लागेल असा चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होतो आहे. याचा नकारात्मक परिणाम आगामी काळात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राणा दांपत्यावर कारवाई होणे आवश्यक असून भाजपच्या नेत्यांनी यावर विचार करावा, अशी मागणी माजी आमदार अडसूळ यांनी केली आहे.