अमरावती; पुढारी वृत्तसेवा : होळीचा दिवस अतिदुर्गम भाग असलेल्या मेळघाटवासियांसाठी काळा रविवार ठरला आहे. एकीकडे दुपारी राज्य परिवहनची बस दरीत कोसळून दोन महिलांसह एका बालकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच सायंकाळी चार वाजताच्या दरम्यान पुन्हा एक अपघात झाला आहे. टिटवा ते धारणी मार्गावर एका भरधाव कार ने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघे ठार झाले आहेत. दुचाकीवरील पती-पत्नीसह त्यांच्या दोन मुलांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. संबंधित कुटुंब हे होळी सणा निमित्त बाजारात खरेदी करण्यासाठी धारणी येथे गेले होते. तेथून परत धोतरा येथे येत असताना हा अपघात झाला. अपघातासाठी कारणीभूत ठरणाऱ्या कारचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सांगण्यात येत आहे.