नवीन पुनर्वसनाच्या ठिकाणी सर्व मूलभूत सुविधांचे काम सुरू आहे. काही कुटुंबे त्या ठिकाणी राहण्यासाठी गेली आहे. शेतीसुधा नवीन ठिकाणी काही नागरिक करीत आहेत. प्रशासनाचा असा प्रयत्न आहे की येणाऱ्या तीन महिन्यांमध्ये ज्या मूलभूत सुविधा आहेत. त्यामध्ये इमारती, शाळा, अंगणवाडी, समाज मंदिर, रस्ते, आरोग्य सुविधा निर्माण करून गावाला सर्व इमारतींचे बांधकाम पूर्ण करून सुस्थितीमध्ये हस्तांतरित करून देण्यात येईल. त्यामुळे पुढील चार महिन्यांमध्ये रानतळोधी गावातील नागकिर पुनर्वसनाच्या ठिकाणी वास्तव्याला येतील, असा विश्वास ताडोबा व्याघ्र् प्रकल्पाचे संचालक डॉ. डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी पुढारीशी बोलताना व्यक्त केला.