नागपूर : जमिनीच्या वादात शेजाऱ्यानेच केला महिलेचा खून | पुढारी

नागपूर : जमिनीच्या वादात शेजाऱ्यानेच केला महिलेचा खून

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : इमामवाडा परिसरात शेजारी राहणाऱ्या तरुणाने एका महिलेची चाकूने हत्या केल्याची घटना घडली. संशयित दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. अवैध दारू विक्रीच्या कारणावरुन ही घटना घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी (दि. २५) दुपारी चारच्या सुमारास दहीकर झेंड्याजवळ आजूबाजूला राहणारे आरती निकोलस (वय 38) व बादल राजू कुंभरे (वय 28) यांच्यात झोपडीच्या जागेवरून वाद सुरू होता. या झोपडीच्या जागेच्या कारणावरूनच या दोघांच्यातील वाद विकोपाला गेला. बादल राजू कुंभरे या तरूणाने रागाच्या भरात चाकूने आरती यांच्यावरवर केले, यात ती गंभीर जखमी झाली. परिसरातील नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. जखमी आरतीला उपचाराकरिता मेडिकल हॉस्पिटलमध्ये भरती केले. मात्र, उपचार सुरू असताना ती मरण पावली. आरोपी बादल राजू कुंभरे यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

Back to top button