Virat Kohli's Lost New Phone : नागपुरात हरवला विराट कोहलीचा नवा कोरा फोन ! | पुढारी

Virat Kohli's Lost New Phone : नागपुरात हरवला विराट कोहलीचा नवा कोरा फोन !

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटीसाठी भारतीय क्रिकेट संघ सध्या नागपुरात आहे. या संघाची, आयोजकांची नागपुरात जोरदार तयारी सुरु असताना माजी कर्णधार विराट कोहलीच्या ट्विटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याच्या या ट्वीटवर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. आपला नवा कोरा फोन हरवला असून तो कोणाला सापडला का, असा प्रश्न कोहलीने ट्विटच्या माध्यमातून केला आहे. अर्थातच नागपुरात खळबळ माजली असली तरी हा फोन केव्हा व कुठे हरवला, याची कुठलीही माहिती त्याने दिलेली नाही. मात्र, कोहली नागपुरात असल्याने हा प्रकार नागपुरात घडला असावा, असे कयास लावले जात आहेत. (Virat Kohli’s Lost New Phone)
विराट कोहली आपल्या ट्विटमध्ये नमूद करतो की,  “अनबॉक्स न केलेला नवा कोरा फोन हरवण्याच्या दु:खापेक्षा मोठे काही नाही. माझा फोन कोणी पाहिला आहे का?” असा सवालही त्याने केला आहे. त्याच्या या ट्विटवर अनेक कमेंट्स येत आहेत.  झोमॅटोने  त्याला ‘वहिनीच्या (अनुष्का) फोनवरून आईस्क्रीम ऑर्डर करण्याचा सल्ला दिलाय. अनेक चाहत्यांनी त्याला नवीन खरेदी करा, तुमच्याकडे पैशांची  कमतरता आहे का, असा सल्ला देखील दिलाय. (Virat Kohli’s Lost New Phone)
भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील पहिला सामना जामठा येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर होणार आहे. या मैदानावर त्याने आतापर्यंत तीन सामन्यांत 88.50 च्या प्रभावी सरासरीने 354 धावा केल्या आहेत. त्यामुळे आगामी सामन्यातही विराटच्या दमदार खेळीकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा

Back to top button