‘भारत जोडो’ यात्रेसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील २ हजार कार्यकर्ते रवाना | पुढारी

‘भारत जोडो’ यात्रेसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील २ हजार कार्यकर्ते रवाना

चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा : भारत जोडो यात्रेसाठी चंद्रपूर जिल्ह्यातून सुमारे 2 हजार कार्यकर्ते सोमवारी वाशिमकडे रवाना झाले. माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात दुपारी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या कार्यालयाजवळ एकत्र झाले होते. त्यानंतर त्यांनी वाशिमकडे प्रस्थान केले.

त्यापूर्वी माजी पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांनी, पत्रकार परिषदेला संबोधित केले. वडेट्टीवार म्हणाले, सोमवारी रात्रीपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना वाशिमला पोहचायचे आहे. मंगळवारी 3 वाजल्‍यापासून आम्ही सर्व कार्यकर्त्यांसह या यात्रेत सहभागी होणार आहोत. येत्या 18 नोव्हेंबरपर्यंत ही यात्रा शेगावला पोहचेल. त्या ठिकाणी जाहीर सभेपर्यंत आम्ही राहुल गांधी यांच्यासोबत राहू. या सर्व कार्यकर्त्यांची राहण्याची व्यवस्था वाशिम आणि पातूर येथे करण्यात आली आहे. यावेळी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला कार्यकर्ते उपस्थित होण्याकरिता उत्साहीत आहेत.

हेही वाचा :  

Back to top button