ठाणे : तानसा धरण क्षेत्रात संततधार सुरूच; धरणाच्या पाणी पातळीत वाढ

शहापूर, भिवंडीतील गावांना सतर्कतेचा इशारा
Tansa Dam Water Level
तानसा धरण तुडूंब भरुन वाहण्याची शक्यता आहे.Pudhari News Network

ठाणे : शहापूर तालुक्यातील धरण क्षेत्रात अतिवृष्टी होत असून पाणी साठा झपाट्याने वाढत असल्याने तानसा धरण भरण्याची शक्यता आहे. रात्रभर असाच पाऊस पडला तर कोणत्याही क्षणी धरण भरून वाहू शकतो. त्यामुळे शहापूर आणि भिवंडी तालुक्यातील धरण परिसरातील सर्व गावे, पाडे, वाड्याना ठाणे जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

बृहनमुंबई महानगरपालिकेच्या तानसा धरणाची पातळी 127.51 मी.मी. टिएचडी इतकी आहे. तानसा धरण ओसंडून वाहण्याची पातळी 128.63 मी.टीएचडी इतकी आहे. तानसा धरण परिसरात सतत पर्जन्यवृष्टी होत असून, धरण परिसरातील सध्याचे पावसाचे प्रमाण लक्षात घेता तानसा धरण लवकरच भरुन वाहण्याची शक्यता आहे.

तरी तानसा धरणाखालील व तानसा नदीलगतच्या, आजूबाजूच्या परिसरातील शहापूर तालुक्यातील भावसे, मोहिली, वावेघर, अघई, टहारपूर, नवेरे, वेलवहाळ, डिंबा व खैरे, भिवंडी तालुक्यातील बोरशेती, एकसाल, चिंचवली, कुंडे, रावडी, अकलोली, वज्रेश्वरी, महाळूंगे व गणेशपुरी, वाडा तालुक्यातील निभावली, मेट, व गोरांड आणि वसई तालुक्यातील खानिवडे, घाटेघर, शिरवली, अदने, पारोल, अंबोडे, भटाणे, साईवान, काशीद कोरगाव, कोपरगाव, हेडावडे व चिमणे या गाव, वाड्या, पाड्यांमधील रहिवाश्यांनी याची नोंद घ्यावी, प्रशासन सर्व प्रकारच्या सुरक्षित उपाययोजनांसाठी सज्ज असून जनतेने प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम परदेशी यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news