भिवंडी : खरिपातील शेतकरी स्तरावरील -पीक पाहणीला सात दिवसांची-मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता शेतकर्यांना सोमवार, दि. 23 सप्टेंबरपर्यंत आपल्या पिकांची ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे.
राज्य शासनाने याबाबत शासन निर्णय काढला आहे. राज्यस्तरीय संनियंत्रण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावर्षी खरीप ई-पीक पाहणीला 1 ऑगस्टपासून सुरुवात झाली होती. 15 सप्टेंबरपर्यंत शेतकर्यांना ई-पीक पाहणी योजनांचा नोंदणीकरिता मुदत देण्यात आली होती. परंतु राज्यासह पालघर जिल्ह्यातही बहुतेक ठिकाणी मुसळधार पाऊस व तांत्रिक कारणांमुळे शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणी विहित मुदतीत पूर्ण झाली नाही, असे निदर्शनास आले होते. याबाबत प्रशासनाकडून योग्य त्या प्रमाणात प्रचार, प्रसिद्धी न झाल्याने शेतकर्यांमार्फत ई-पीक पाहणीची नोंदही कमी प्रमाणात नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे खरीप हंगाम 2024 करीता शासनाने आता 7 दिवसांची मुदतवाढ दिली आहे.
तसेच तलाठी स्तरावरील पीक पाहणीची मुदत दिवसांनी वाढविली असून 23 ऑक्टोबर पर्यंत वाढ करण्यात आली आहे. शासकीय लाभ घेण्यासाठी पाहणी अनिवार्य आहे. ई-पीक पाहणी वेळेत न झाल्यास बहुतांश शेतकर्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. ऑनलाइन पद्धतीने पिकांची नोंद सातबार्यावर लागते. कधीही, कोठूनही सातबारा काढता येतो. शासनाचे विविध अनुदानासाठी, पीकविम्याचा लाभ मिळण्यासाठी, शेतकर्यांनी ई-पीक पाहणी करणे अनिवार्य आहे.