भिवंडी : टीबी झालेल्या अथवा होऊन गेलेल्या नागरिकांसह ज्येष्ठ नागरिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रौढ बीसीजी लसीकरणाचा प्रारंभ मनपा आयुक्त अजय वैद्य यांनी स्वतः लस टोचून शुक्रवारी (दि.13) केला आहे. महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग अंतर्गत शांतीनगर येथे नवीन आपला दवाखान्याचे उद्घाटन मनपा आयुक्त वैद्य यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आयुक्तांनी स्वतः प्रौढ बीसीजी लस घेतली आहे.
प्रौढ बीसीजी लसीकरण हे 18 वय वरील मागील पाच वर्षात टीबी झालेली व्यक्ती, 1 जानेवारी 2021 पासून टीबी रुग्णांच्या संपर्कात असणारे व्यक्ती, 60 वर्ष वरील व्यक्ती, सिगारेट किंवा बिडी घेणारे व्यक्ती, तसेच मधुमेह असणारे व्यक्ती हि प्रौढ बीसीजी लस देण्यात येत आहे. लहानपणी जन्मत: मुलांना जी लस दिली जाते तीच हि लस असून नागरिकांच्या आरोग्यासाठी महत्वाची असून या लस पासून कोणताही धोका नसल्याने घाबरण्याची गरज नाही त्यामुळे सर्व नागरिकांनी या लासिकरण मोहिमेत सहभाग होऊन पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पालिका आयुक्त वैद्य यांनी केले. या कार्यकामा प्रसंगी शहर क्षयरोग अधिकारी डॉ. बुशरा सय्यद, डॉ. जयवंत धुळे, डॉ. प्रिया फडके,अनिल गुप्ता, मोबीन शेख आणि नागरी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.