Kalyan-Dombivli RERA Scam : ५४ इमारतींमधील रहिवाशी पुन्हा चिंतेत, पालिकेने पुन्हा बजावल्या नोटीसा

कल्याण-डोंबिवली रेरा घोटाळा; रहिवाश्यांना अश्रू अनावर
Kalyan-Dombivli RERA Scam
Kalyan-Dombivli RERA Scam : ५४ इमारतींमधील रहिवाशी पुन्हा चिंतेतFile Photo
Published on
Updated on

Residents of 54 buildings are in trouble again

कल्याण : पुढारी वृत्तसेवा

डोंबिवलीतील ५४ इमारतींना पालिका प्रशासनाने दोन दिवसांपासून नोटीसा बजावण्यास सुरुवात केली आहे. बेघर होण्याची भीती असल्याने आपला संसार उघड्यावर पडणार या चिंतेने रहिवाश्यांना अश्रू आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले होते की ६५ इमारतीतील नागरिकांना बेघर होऊ देणार नाही.

Kalyan-Dombivli RERA Scam
Mumbai News : दिघावासीयांना आरोग्‍यसेवेबाबत मिळणार दिलासा, माता-बाल रुग्णालय लवकरच होणार कार्यरत

मात्र पालिकेच्या नोटीसांमुळे आता काय करावे, असा रहिवाश्यांना प्रश्न पडला आहे. रहिवाशी बेघर होणार नाही याकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सरकारशी संघर्ष सुरु केला आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिलासा द्यावा, अशी मागणी ६५ इमारतीमधील रहिवाशांनी केली आहे.

६५ इमारतींपैकी ५४ इमारतींना कल्याण डोंबिवली महापालिकेने पुन्हा नोटीसा पाठवल्यात आहेत. या नोटीसमध्ये लवकरात लवकर इमारत रिकाम्या कराव्यात अन्यथा पोलीस बळ वापरून त्या रिकामा करण्यात येतील, असा इशारा दिला आहे. त्यामुळे या इमारतींमध्ये राहणाऱ्या हजारो रहिवाशांबर बेघर होण्याची भीती सातवीत आहे. १७ नोव्हेंबर रोजी न्यायालयाने या इमारती निष्कासित करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाच्या पार्श्वभूमीवर केडीएमसीने या ६५ इमारतींना इमारती रिकाम्या करून कारवाई करण्यासंदर्भात नोटीसा पाठवल्या होत्या.

Kalyan-Dombivli RERA Scam
Mumbai Drugs seized : मुंबई विमानतळावर २३ कोटींचे अमलीपदार्थ पोलिसांनी केले जप्त

रहिवाशांनी आक्रोश व संताप पाहून याची दखल घेत सरकारने या इमारतीमधील रहिवाशांना बेघर होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली होती. गेल्या दोन दिवसांपासून या इमारतींना नोटीसा पाठवण्यास कल्याण डोंबिवली महापालिकेने सुरुवात केली आहे. आम्ही सर्वसामान्य कुटुंबातून आहोत, आयुष्याचे पुंजी या घरांमध्ये लावली, आमची काही चूक नाही, आम्ही कागदपत्र बघून घर घेतलं होतं, आमची फसवणूक झाली आहे.

कारवाई पण आमच्यावरच होतेय. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी याबाबत ठोस निर्णय घ्या व आम्हाला बेघर होण्यापासून वाचवा, असे रहिवाशांनी सांगितले. दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे यांची रविवार २२ तारखेला या इमारतीतील रहिवाशांनी भेट घेतली.

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनावर ठाम रहावे !

प्रणव पाटील व रोहन गमरे हे रहिवाशी यांवर सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनावर ठाम रहावे व या नागरिकांना दिलासा द्यावा, असे यावेळी सांगितले. कल्याण जिल्हाप्रमुख जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी सांगितले की, ६५ इमारतीमधील रहिवाशांना जे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये दिले होते त्या आश्वासनावर मुख्यमंत्र्यांनी ठाम रहावे.

प्रशासनाने मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची दखल घेऊन सगळ्या नोटिसा परत घ्याव्यात, नागरिकांना दिलासा मिळाला नाही तर मुख्यमंत्री यांची नागरिकांसह भेट घेणार आहे. ६५ इमारती मधील सर्व नागरिकांच्या पाठीशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष खंबीरपणे उभा असल्याचे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news