

ठाणे : यंदाचे भाद्रपद पौर्णिमेचे खग्रास चंद्रग्रहण खगोलप्रेमींसाठी एक खास पर्वणी घेऊन येत आहे. येत्या रविवार, ७ सप्टेंबर रोजी होणारे हे चंद्रग्रहण संपूर्ण भारतातून दिसणार आहे, अशी माहिती पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली आहे.
रविवारी (दि.7) रात्री ९ वाजून ५७ मिनिटांनी ग्रहणास सुरुवात होईल. त्यानंतर रात्री ११ ते १२ वाजून २३ मिनिटांपर्यंत चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या छायेत आल्याने खग्रास स्थिती दिसेल. या वेळी पौर्णिमेचा तेजस्वी चंद्र लालसर किंवा तपकिरी रंगाचा दिसेल, जे एक विलोभनीय दृश्य असेल. रा १२ वाजून २३ मिनिटांनी ग्रह सुटण्यास सुरुवात होईल. उत्तररात्री १ वाजून २७ मिनिटांनी पूर्णपणे संपेल. हे चंद्रग्रहण कोणत्या प्रकारच्या उपकरणांशिवाय, डोळ्यांनी पाहता येणार आहे.
हे खग्रास चंद्रग्रहण केवळ भारतातच नाही, संपूर्ण आशिया, आफ्रिका, युरो ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधून पाहता येणार आहे. खगोलशा अभ्यासकांसाठी आणि सामान लोकांसाठीही ही एक दुर्मिळ सं आहे. यानंतरचे पुढील चंद्रग्रहण थेट मार्च २०२६ रोजी होईल, असे सोमण यांनी सांगितले.