विधान परिषदेतील भाजपाचे गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनीही लक्षवेधीवर विविध मुद्दे मांडले. विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार, राज्यात धर्मांतरीत ८० लाख ख्रिश्चन व १२ लाख मुस्लिम असल्याचे उत्तर देण्यात आले होते. तर भारतीय अधिनियम १३५ अनुसार, अनुसुचित जाती-जमातींमधून येणाऱ्या व्यक्तींना आरक्षण नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आदिवासींच्या आरक्षणाचा फायदा धर्मांतरीतांना देता कामा नये, अशी मागणी त्यांनी केली. या लक्षवेधीवरील चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार एकनाथ खडसे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार राजनाथ सिंह, आमदार कपिल पाटील यांनीही सहभाग घेतला. अंधश्रद्धेचा फायदा घेऊन आदिवासींचा गैरफायदा घेण्याच्या वृत्तीवर कारवाईची मागणी दानवे यांनी केली. तर जबरदस्ती व प्रलोभन दाखवून होणाऱ्या धर्मांतराबद्दल कठोर कारवाई करण्याची मागणी खडसे यांनी केली.