

सोलापूर : ऐन उन्हाळ्यात जुळे सोलापुरातील रेणुका नगरात पाण्याची टंचाई जाणवत आहे. पाणी टँकरद्वारे विकत घेण्याची वेळ आली आहे, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत.
जुळे सोलापुरातील रेणुका नगरीत सहाशे घरांची वसाहत आहे. येथे गेल्या चार महिन्यांपासून पालिकेकडून पाणीपुरवठा नियमित नाही, कमी दाबाने पाणी येते, अशा तक्रारी आहेत. याबाबत चौकशी केल्यास अधिकाऱ्यांकडून सरकारी ढंगात या नागरिकांना उत्तरे मिळतात. ऐन उन्हाळ्यात पाण्यासारख्या गंभीर समस्येने येथील नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. सध्या खासगी टँकरद्वारे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. महापालिकेतील पाणीपुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून लक्ष देऊन सुरळीत पाणीपुरवठा होण्याची अपेक्षा आहे.
आठ दिवसाने तेही कमी दाबाने पाणी येते. धड साठवणूकसुद्धा करता येत नाही. म्हणून यांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. नियमित पाणी येत नसल्याने खासगी टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ या कुटुंबीयांवर येत आहे.