Solapur News: ग्रामपंचायतीचे कामकाज दिवाळीत बंद होण्याची शक्यता

सानुग्रह अनुदान प्रकरण : कामावर बहिष्कार टाकण्याचा कर्मचार्‍यांचा इशारा
Solapur News |
Solapur News: ग्रामपंचायतीचे कामकाज दिवाळीत बंद होण्याची शक्यताFile Photo
Published on
Updated on

सोलापूर : जिल्ह्यासह राज्यातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना पंधरा हजार सानुग्रह अनुदान द्यावे. तसेच इतर प्रलंबित प्रश्न सोडवा, अन्यथा ऐन दिवाळीत ग्रामपंचायतच्या संपूर्ण कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामपंचायत कर्मचार्‍यांनी दिला आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत ग्रामपंचायतीचे कामे बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महाराष्ट्र राज्यात 27 हजार ग्रामपंचायत असून, त्यामध्ये 60 ते 70 हजार ग्रामपंचायत कर्मचारी विविध पदावर काम करत आहेत. परंतु गेल्या दहा ते बारा वर्षात राज्यातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या कोणतेही प्रश्न सरकारने मार्गी लावलेले नाहीत. मागील विधिमंडळाच्या झालेल्या प्रत्येक अधिवेशनामध्ये अनेक आमदारांनी ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे विविध प्रश्न, मागण्याबाबत सभागृहात प्रश्न उपस्थित करून ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. मात्र, शासनाने ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा दावा ग्रामपंचायत कर्मचार्‍यांनी केला आहे.

राज्यातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना युनियनच्या माध्यमातून सतत पत्र व्यवहार ग्रामपंचायत कर्मचार्‍यांकडून करण्यात आले आहे. मात्र, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना सध्या मिळणारे वेतन अतिशय तुटपुंजे असून, ते वेतन देखील दोन वर्षापासून कधीच वेळेवर मिळत नाही. ऑनलाइन वेतन प्रणाली जाणीवपूर्वक बंद ठेवलेली आहे. ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी वसुलीची अट लावलेल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे हाल होत आहेत.

सरपंच, ग्रामसेवकांना हवी वसुलीची अट

ग्रामपंचायत अधिकार्‍यांना दरमहा लाखो रुपयांच्या घरात वेतन मिळते. सध्या त्यांना सातवा वेतन आयोगानुसार वेतन मिळत आहे. तसेच सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांना देखील शासनाकडून मानधन दिले जात आहे. परंतु सरपंच व उपसरपंच यांच्या मानधनासाठी देखील वसुलीची कोणतीही अट लावलेली नाही. मात्र, त्यांना वसुलीची अट लावावी, अशी मागणी ग्रामपंचायत कर्मचार्‍यांतून होत आहे.

ग्रामपंचायत कर्मचार्‍यांची दिवाळी गोड होणार नाही. राज्यातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना दिवाळीनिमित्त 15 व्या वित्त आयोगातून पंधरा हजार रुपये बोनस द्यावे. तसेच इतर प्रलंबित प्रश्न तत्काळ सोडून कर्मचार्‍यांनी न्याय द्यावा. अन्यथा ग्रामपंचायतच्या कामकाजावर राज्य ग्रामपंचाय, जिल्हा परिषद नगर परिषद कामगार युनियनच्या वतीने ऐन दिवाळीत सर्व कामकाज ठप्प करून कामांवर बहिष्कार टाकण्यात येईल.
- दिलीप जाधव, सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news