

सोलापूर : जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत आतापर्यंत तब्बल एक लाख 45 हजार 500 घरकुलांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यामुळे घरकुलाच्या प्रतीक्षेत असलेल्या पात्र लाभार्थ्यांना लवकरच घरकुल मिळणार आहे.
ग्रामीण भागातील बेघर, कच्च्या घरात राहणारे तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबांची ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करण्यात येत आहे. महसूल, ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर अर्जांची छाननी सुरू होणार असून पात्र लाभार्थ्यांना घरकुल मिळणार आहे.
उत्पन्न मर्यादा, घराची सद्यस्थिती, सामाजिक घटक आदी बाबींची तपासणी करून शासनाच्या निकषांनुसार लाभार्थ्यांची अंतिम निवड केली जाणार आहे. तसेच अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांची कारणे स्पष्ट केली जाणार असून पारदर्शकतेवर भर देण्यात येणार आहे.