

सोलापूर : शिक्षणसम्राट म्हणून सर्वांना परिचित असलेले डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने शिक्षण, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे. बहुजन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांची तळमळ होती. त्यांनी उभारलेल्या शैक्षणिक संस्थांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या जीवनाला नवी दिशा मिळाली. त्यांचा आदर्श घेऊन शिक्षण क्षेत्रात काम करून जास्तीत जास्त मुलांना शिकवावे, हीच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल, अशा भावना सोलापूर जिल्ह्यातील शैक्षणिक, राजकीय मान्यवरांनी व्यक्त केल्या...