

सोलापूर : राज्यातील इंग्रजी, हिंदी, उर्दू, तमिळसह सर्व माध्यमांच्या शाळांना मराठी पाठ्यपुस्तक अनिवार्य करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने परिपत्रक काढले आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षापासून सर्व माध्यमांच्या शाळेत मराठीचे धडे शिकविण्यात येणार आहे.
राज्यातील सर्व माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मराठी विषयाची गोडी लागावी, यासाठी पाठ्यपुस्तक अनिवार्य केले आहे. त्यामुळे आता इतर माध्यमांच्या शाळांना मराठी विषय सक्तीने शिकवावा लागणार आहे. विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे ज्ञान मिळावे, स्थानिक संस्कृती व परंपरेची ओळख व्हावी, दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर वाढावा या उद्देशाने शासनाने हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
या वर्गांचा अभ्यासक्रम पुढील वर्षी बदलणार
पाचवी, सातवी, नववी आणि अकरावी वर्गाचा पुढील वर्षी म्हणजे 2027 साली अभ्यासक्रम बदलणार आहे. त्यामुळे सन 2026-27 मध्ये या वर्गाची पाठ्यपुस्तके खरेदी आवश्यकतानुसार करावी, अशा सूचना केल्या आहेत.