

सातारा : सातारा जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची रेल भवन येथे भेट घेऊन चर्चा केली.
जरंडेश्वर स्थानकावर ११०३९/ ११०४० व ११४२५/ ११४२६ गाड्यांना थांबा देण्याची, तर कराड येथे १६५३३/ १६५३४, ११०४९/ ११०५० व २०६६९/ २०६७० गाड्यांना थांबा देण्याची मागणी करण्यात आली. सातारा येथे १९६६८/१९६६७, २२६८५/२२६८६ व १२६२९/ १२६३० गाड्यांना थांबा देण्याबरोबरच दादर-हुबळी एक्सप्रेसचा थांबा पूर्ववत करण्याची मागणी करण्यात आली.
सह्याद्री एक्सप्रेस मुंबईपर्यंत पूर्ववत करावी, दादर-सातारा एक्सप्रेस दररोज चालवावी आणि राणी चेनम्मा एक्सप्रेस साताऱ्यापर्यंत वाढवावी, अशी मागणीही करण्यात आली. या मागण्यांवर रेल्वेमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली असून, लवकर निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.