

सातारा : दिल्लीत नीट परीक्षा अन् पेपरफुटीविरोधात सुरु असलेल्या विद्यार्थी आंदोलनाची धग जिल्ह्यापर्यंत पोहचली आहे. समाजमनातून तीव्र पडसाद उमटूले असून विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर उतरु लागले आहेत. संविधान, पुस्तके घेवून झेनझी रॅली काढून शिक्षण व्यवस्था, परीक्षा आयोजक यंत्रणांचा निषेध करत आहेत.
जिल्ह्यातील विविध संस्था, संघटना या झेनझीना खंबीर पाठिंबा देत आहेत. संविधानिक मार्गाने शांतेत आपले म्हणणे मांडणार्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांचे प्रश्न समजून घेण्याची गरज होती. मात्र तसे न होता आंदोलन दडपण्याच्या प्रयत्नामुळे हिंसक वळण लागल्याने संपूर्ण व्यवस्थेबाबतच तीव्र संंताप व्यक्त करण्यात येत आहे.