

पुढारी ऑनलाईन डेस्क : नायगावच्या मातीने वेगळी ऊर्जा दिली आहे. महात्मा जोतिबा फुले यांनी विषमता दूर करून समतेचे बीज पेरले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.३) येथे केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंतीनिमित्त नायगाव (सातारा) येथील त्यांच्या जन्मस्थळी अभिवादन केले. यावेळी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री अतुल सावे, मंत्री शंभुराज देसाई, आमदार छगन भुजबळ आदी उपस्थित होते.