

सातारा : ऐतिहासिक सातारा जिल्ह्याच्या विकासाचा मार्ग खुला करणारा अर्थसंकल्प सातारा जिल्ह्याला पावला आहे. दै. ‘पुढारी’ने शुक्रवारी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर ‘साताऱ्याचा दबदबा राहणार का?’ असा सवाल केला होता. एक उपमुख्यमंत्री व चार मंत्री असलेल्या सातारा जिल्ह्याला अर्थसंकल्पाने ‘छप्पर फाडके’ निधी दिला आहे.
मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, पालकमंत्री शंभूराज देसाई, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या रेट्याने सातारा जिल्ह्याच्या विकासाचे दार उघडले आहे. जिल्ह्याचा मंत्री समुह धावला आणि अर्थसंकल्प पावला असेच या घडामोडीचे वर्णन करावे लागेल.