सातारा; पुढारी वृत्तसेवा : कर्ज देण्याच्या नावाखाली अनेक फायनान्स कंपन्या सामान्य जनतेची आर्थिक फसवणूक करत असल्याच्या तक्रारी आहेत. कंपन्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील गोरगरीब सामान्य जनतेकडून कर्ज देण्याच्या नावाखाली आर्थिक लूट करून मानसिक त्रास दिला जात आहे. कर्जाच्या नावाखाली वसुली करून त्यांच्याकडूनच जीएसटी कपात करून घेतला जात आहे. यामुळे जनतेची फसवणूक होत आहे.