महाबळेश्वर : कांदाटी खोर्यातील कांदाट गावात विजेची तार अंगावर पडून विजेच्या धक्क्याने रघुनाथ भागू मोरे यांच्या बैलाचा जागीच मृत्यू झाला. मेढा वीज वितरणच्या हलगर्जीपणाचा फटका या शेतकर्याला बसला. मेढा विभागाच्या अखत्यारीत तापोळा विभाग येतो. याच भागातून कांदाटी भागात उच्च दाब वीज वाहिनी (हाय व्होल्टेज लाईन) गेली असून अनेक वर्षे तारा बदलण्याची मागणी नागरिक करत आहेत. मात्र, मेढा वीजवितरण विभागाने याकडे दुर्लक्ष केले. कांदाट गावातून पुढे जाणारी वीज तार बैलाच्या अंगावर पडली. त्यामुळे शॉक बसून बैलाचा मृत्यू झाला. संबंधित शेतकर्यास वीज वितरणने तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.