सातारा : २२ महिन्यांच्या पगारासाठी ४०० कामगारांचा ‘किसनवीर’समोर ठिय्या | पुढारी

सातारा : २२ महिन्यांच्या पगारासाठी ४०० कामगारांचा 'किसनवीर'समोर ठिय्या

सातारा : पुढारी वृत्तसेवा; सातारा जिल्ह्यातील भुईंज येथील किसनवीर सहकारी साखर कारखान्यामधील कामगारांना २२ महिन्यांपासून पगार न मिळाल्याने आज (सोमवार) त्यांनी कारखान्याच्या गेट समोर ठिय्या आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात सुमारे ४०० पेक्षा अधिक कामगार सहभागी झाले आहेत.

भुईंज येथील हा कारखाना गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे यावर्षी गाळप सुद्धा होऊ शकलेले नाही. परिणामी या कारखान्यातील कामगारांना गेल्या बावीस महिन्यांपासून पगार मिळालेला नाही.

त्यामुळे कामगारांनी कारखान्याच्या प्रवेशद्वाराबाहेर आक्रोश आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात सुमारे ४०० कामगार सहभागी झाले आहेत. यावेळी कारखान्यातील ज्येष्ठ कामगार म्हणाले, माजी आमदार आणि विद्यमान अध्यक्ष मदन भोसले आजही हा कारखाना चालावा यासाठी आणि आमच्यासाठी प्रयत्न करीत आहेत. हे आम्हांला माहिती आहे. परंतु आमची सहनशीलता संपली आहे. वाढत्या महागाईमुळे आमचे कुटुंब आता त्रस्त झाले आहे. त्यामुळे आज कारखान्यासमोर आंदोलन छेडावे लागले आहे.

Back to top button