कडेगाव : नाशिकनंतर सांगली जिल्हा हा देशातील सर्वात मोठ्या द्राक्ष उत्पादकांपैकी एक आहे. मात्र, हवामान बदल आणि रासायनिक अवशेषांचे (रेसिड्यू) संकट द्राक्ष उत्पादकांसमोर भीषण समस्या निर्माण करत आहे. याच पार्श्वभूमीवर, सांगलीत ‘रेसिड्यू फ्री’ संशोधन संस्था होणार का? अशी विचारणा आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी विधानसभेत सरकारकडे केली.
कदम म्हणाले, नाशिक जिल्ह्याप्रमाणेच सांगलीतील शेतकर्यांनाही द्राक्षपिकाविषयी विज्ञानाधारित संशोधनाची आवश्यकता आहे. सरकार यासाठी कोणती ठोस पावले उचलणार आहे? याबाबत शेतकर्यांमध्ये उत्सुकता आहे. याशिवाय, बेदाणे उत्पादक शेतकर्यांच्या व्यापार्यांकडून होणार्या फसवणुकीचा मुद्दाही कदम यांनी विधानसभेत लावून धरला. बेदाण्याच्या दरात पारदर्शकता आणण्यासाठी सरकारकडून ठोस नियमन होणार आहे का? असे ते म्हणाले.