जातनिहाय जनगणनेतून मुस्लिम आरक्षणाचा काँग्रेसचा डाव : तावडे

Maharashtra Assembly Election : विरोधकांकडून मतांसाठी जनतेला भूलवण्याचे काम
Vinod Tawde
विनोद तावडेPudhari Photo
Published on
Updated on

सांगली : ‘जिनकी जितनी भागीदारी, उनकी उतनी हिस्सेदारी’ असा काँग्रेसचा नारा आहे. त्यातून मुस्लिमांना आरक्षण देण्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा डाव आहे. त्यासाठीच जातनिहाय जनगणनेची मागणी ते करत आहेत, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत केली.

तावडे म्हणाले, समाज जातीजातीत विभागण्याचा काँग्रेसचा डाव आहे. त्यामुळे जातनिहाय जनगणनेची मागणी काँग्रेसह विरोधी पक्षांकडून होत आहे. मतांसाठी जनतेला भूलवण्याचे काम विरोधक करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक हैं तो सेफ हैं’ असा नारा दिल्यानंतर विरोधक त्यांच्यावर तुटून पडले. त्यातून विरोधकांची मानसिकता लपून राहत नाही. कर्नाटकमध्ये काँग्रेसने ओबीसींचे आरक्षण मुस्लिम समाजाला देत ओबीसींमधील घटकांना हक्कांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला.

मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकवू

तावडे म्हणाले, मराठा आरक्षणाची मागणी जुनी आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता असताना त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. भाजपने मात्र 13 टक्के आरक्षण दिले. उच्च न्यायालयात ते टिकले. भाजपची सत्ता असेपर्यंत सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला धक्का लागला नाही; मात्र ठाकरे सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू योग्य प्रकारे मांडली नाही. पुरेशी कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यामुळे आरक्षण रद्द झाले. महायुती सरकारने मराठा आरक्षण दिले आहे. ते सर्वोच्च न्यायालयातही टिकवू.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news