

इस्लामपूर : जत तालुक्यात माजी मंत्री आ. जयंत पाटील यांच्या दूरदृष्टी व अथक् प्रयत्नातून पाणी आल्याने उसाचे प्रमाणही वाढले आहे. सर्वांच्या सहकार्याने राजारामबापू कारखाना या गळीत हंगामात आपले निश्चित केलेले उद्दिष्ट पूर्ण करेल, असा विश्वास कारखान्याचे ज्येष्ठ संचालक, मामासाहेब पवार सत्यविजय सहकारी बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार यांनी व्यक्त केला.
राजारामबापू कारखान्याच्या जत-तिप्पेहळ्ळी युनिटमध्ये पवार यांच्या हस्ते रोलरपूजन करण्यात आले. यावेळी कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, सिव्हिल इंजिनिअर प्रेमनाथ कमलकार, रघुनाथ भिसे, चिफ केमिस्ट एन. एम. जगताप, ऊस पुरवठा अधिकारी नितीन पाटील उपस्थित होते. माहुली म्हणाले, यावर्षी जत तालुक्यात पाऊस चांगला झाल्याने व माजी मंत्री आ. जयंत पाटील जलसंपदामंत्री असताना जत तालुक्यातील सर्व योजनांना गती दिल्याने पाण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने उसाच्या क्षेत्रातही वाढ झाली आहे. शेतकर्यांनी जास्तीत जास्त ऊस पुरवठा करावा. एन. एम. जगताप यांनी आभार मानले. प्रमोद आरळी, सुरेश पाटील, रत्नाकर शिंदे, प्रतीक मोरे, अजित विभुते, निखिल गावडे, संदीप जाधव, सुदर्शन चव्हाण, पंकज पाटील, श्रीनिवास कुंभार, शरद पाटील उपस्थित होते.