

सांगली : राज्य सरकारने शेतकर्यांची कर्जमाफी नाकारल्याच्या निषेधार्थ सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने रविवारी काळी गुढी उभारून निषेध व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले, विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकर्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन महायुतीने दिले होते. त्यांच्या जाहीरनाम्यातही तशी घोषणा केली होती. मात्र सत्तेवर आल्यानंतर महायुतीच्या नेत्यांना याचा विसर पडला आहे. कर्जमाफी शक्य नाही, त्यामुळे शेतकर्यांनी कर्ज भरावे, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी अधिवेशनात जाहीर केले. शेतकर्यांची ही फसवणूक आहे. यावेळी भरत चौगुले, प्रकाश मिरजकर, अजित हळिंगळे, तानाजी चव्हाण, संजय बेले, संदीप राजोबा, सर्जेराव पवार, बाबासोा संदे, आप्पासाहेब पाटील, बाबासाहेब पाचोरे, शशिकांत पाटील, विजयकुमार पाटील, सुरेश पचिंब्रे उपस्थित होते.