

विटा: पुढारी वृत्तसेवा : विटा, आटपाडी आणि खानापूर शहराच्या पिण्याच्या पाणी योजनांना तीन महिन्याच्या आत प्रशासकीय मान्यता आणि निविदा काढण्याची प्रक्रिया व्हावी, अशी मागणी आमदार अनिल बाबर यांनी आज (दि.२८) विधीमंडळात केली.
आज विधानसभेत आमदार बाबर यांनी औचित्याच्या मुद्दयाद्वारे सरकारकडे याबाबत मागणी केली. आमदार बाबर म्हणाले, खानापूर मतदारसंघात विटा येथे नगरपालिका, आटपाडी आणि खानापूर येथे नगरपंचायत आहे. वीस वर्षांपूर्वी या गावांना पाणीपुरवठा योजना झाल्या आहेत. मात्र, आता त्या योजनांच्या जलवाहिन्या जीर्ण झालेल्या आहेत. वाढत्या शहरीकरणामुळे ४ ते ५ दिवसांतून गावामध्ये पाणी येते. २४ मे २०२२ मध्ये तत्कालिन नगरविकास मंत्री यांनी बैठक घेऊन विटा, आटपाडी व खानापूर या तिन्ही शहरांना पाणी देण्याच्यादृष्टीने योजना करण्याचे आदेश दिले होते. आता येत्या तीन महिन्याच्या आत या योजनांना प्रशासकीय मान्यता मिळवून निविदा काढण्याची प्रक्रिया व्हावी, अशी मागणी आमदार बाबर यांनी केली आहे.
हेही वाचा