सांगली; पुढारी वृत्तसेवा : केंद्रातील भाजप सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेमुळे देशातील तरुणांचे भवितव्य धोक्यात आले आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँगेसचे उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी येथे केली.
जिल्हा काँग्रेसच्यावतीने सोमवारी काँग्रेस कमिटीसमोर निदर्शने करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा शैलजा पाटील, नंदकुमार शेळके, जिल्हा काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले, देवानंद जंबगी, जिल्हा युथ काँग्रेसच्या उपाध्यक्षा गितांजली पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.