Raigad | खालापूर-कुंभिवलीतील कारखान्यात आगीचा भडका

आगीत कच्चामाल जळून खाक; सुदैवाने जीवितहानी नाही
Raigad
खालापूर-कुंभिवलीतील कारखान्यात आगीचा भडकाpudhari photo
Published on
Updated on

खालापूर-खोपोली : कार्बन पूड तयार करणार्‍या तालुक्यातील कुंभिवली येथील विजयप्रीत कारखान्यात मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास आग लागण्याची घटना घडली. आगीत जीवितहानी झाली नसली कच्चामाल जळून नुकसान झाले आहे.

खालापूर सावरोली राज्य मार्गावर कुंभिवली गावाचे हद्दीत विजयप्रीत कारखाना असून या ठिकाणी टायर पासून कार्बन पूड तयार करण्यात येते. मंगळवारी सकाळी नऊ वाजता सुमारास बॉयलरच्या ठिणग्यामुळे कच्चा माल असलेला टायरने पेट घेतला आणि आग झपाट्याने पसरली. आगीची घटना समजताच खालापूर पोलिसांनी तातडीने अग्निशमन दलाशी संपर्क साधून खोपोली नगरपरिषदेचा अग्निशमन बंब आणि नजीकच्या मंगलम कारखान्यातून अग्निशामक बंबाला पाचारण केले. जवळपास चार तासाच्या आतापर्यंत नंतर आज पूर्णपणे विझवण्यात यश मिळाले.

रबरी टायर असल्याने आग मोठ्या प्रमाणात भडकली. दोन बंबाने मिळून आठ फेर्‍यांमध्ये आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. आग पूर्णपणे नियंत्रण आल्याची तसेच कोणती जीवितहानी झाली नसल्याची माहिती खालापूर पोलिसांनी दिली.

विजयप्रीत कारखान्यात गेल्या वर्षी देखील आगीची घटना घडली होती. अत्यंत जलनशील कच्चामाल असताना या ठिकाणी कोणतीही सुरक्षा यंत्रणा नाही. नजीकच लोक वस्ती असल्याने अशा प्रकारच्या घटनेने भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते अशी भीती ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news