National Lok Adalat Raigad | राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 11 हजार प्रकरणे निकाली

16 कोटी 60 लाखांची तडजोड रक्कम मंजूर; 63 हजार प्रकरणे आली लोकअदालतीमध्ये
रायगड
रायगड जिल्ह्यात आयोजित लोकन्यायालयात दिपप्रज्वलन करताना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश अमोल शिंदे.(छाया : विक्रम बाबर)
Published on
Updated on

रायगड : दाखलपूर्व आणि प्रलंबित खटल्यांचा जलद निपटारा व्हावा आणि प्रलंबित खटले सामोपचाराने मिटावेत या हेतूने 22 मार्च रोजी रायगड जिल्ह्यात आयोजित केलेल्या लोकन्यायालयात अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली.

Summary

वादपूर्व व दाखल अशी एकूण 11 हजार 197 प्रकरणे सामंजस्याने मिटविण्यात यश आले आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश अमोल शिंदे यांनी दिली आहे.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली यांच्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण भारतभर राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये न्यायालयांतील प्रलंबित प्रकरणे तसेच वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. रायगड जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. राजंदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यामध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये रायगड जिल्ह्यातील 52 हजार 860 वादपूर्व प्रकरणे व 10 हजार 155 प्रलंबित अशी एकूण 63 हजार 15 प्रकरणे लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. त्यापैकी 8 हजार 176 वादपूर्व प्रकरणे व 3 हजार 22 प्रलंबित प्रकरणे अशी एकूण 11 हजार 197 प्रकरणे सामंजस्याने मिटवून लोक अदालतीमध्ये निकाली निघाली असून त्याद्वारे पक्षकारांना एकूण 16 कोटी 60 लाख 14 हजार 966 रुपयांची तडजोड रक्कम मिळवून देण्यात आली आहे.

विविध न्यायालयांत 28 लोक अदालतीचे कक्ष स्थापन करण्यात आले होते. लोक अदालतीमध्ये पक्षकारांना न्यायालयात येण्याची सक्ती न करता व्हिडीओ कॉलचा वापर करुनसुध्दा प्रकरणे मिटविण्यात आली.या लोक न्यायालयाला शस्वी करण्यासाठी सर्व न्यायिक अधिकारी, वकील वर्ग, जिल्हा परिषद, रायगड पोलीस अधिक्षक, रायगड व कर्मचारी, सर्व पक्षकार यांनी भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. ए. एस. राजंदेकर व न्यायाधीश तथा सचिव अमोल शिंदे यांनी आभार मानले आहेत.

मोटार अपघाताची 35 प्रकरणे

मोटार अपघात प्रकरणांमध्ये 2 कोटी 70 लाख इतकी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. जिल्ह्यामध्ये एकूण 35 मोटार अपघात प्रकरणांमध्ये तडजोड झाली असून पक्षकारांना 2 कोटी 70 लाख इतकी नुकसान भरपाईची रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

4 जोडप्यांचे जुळले संसार

जिल्ह्यातील लोकन्यायालयात 4 जोडप्यांचा (रोहा-1, महाड-1 अलिबाग-2) सामंजस्याने वाद मिटल्यामुळे संसार सुरळीत झाला आहे. प्रमुख जिल्हा न्यायाधिश ए. एस. राजदेकर यांनी मनोमिलन झालेल्या जोडप्याचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news