Sharad Pawar: देशावर संकट आल्यावर राजकारण बाजूला ठेवून आम्ही सरकारबरोबर: शरद पवार

देशावरील संकटप्रसंगी आम्ही सर्व एकत्र
Sharad Pawar
देशावर संकट आल्यावर राजकारण बाजूला ठेवून आम्ही सरकारबरोबर: शरद पवार File photo
Published on
Updated on

सासवड: पहलगाम येथील हल्ला जाती-धर्माला धक्का नसून, तो भारताला धक्का आहे. देशावर संकट आल्यावर राजकारण बाजूला ठेवून आम्ही सरकारबरोबर आहोत. बाकीचे राजकारण आम्ही निवडणुकीत करू, परंतु देशावर संकट आल्यावर आम्ही सर्व एकत्र आहोत, असे स्पष्ट मत रविवारी (दि. 27) पुरंदर तालुक्यातील सासवड येथे ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांनी एका खासगी कार्यक्रमात व्यक्त केले.

या ठिकाणी ज्येष्ठ समाजवादी नेते रावसाहेब पवार यांच्या 81 व्या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त माजी शरद पवार बोलत होते. खा. पवार म्हणाले, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. जे घडलं ते देशाला एक धक्का होता. भारतावर हल्ला होता.

Sharad Pawar
Weather Update: दिलासादायक! राज्याचा पारा 4 ते 5 अंशांनी घसरला

राजकारणामध्ये मतभिन्नता असेल, पण जेव्हा असा देशवासीयांवर हल्ला होतो, अशावेळी मतभिन्नता नाही, असे खा. पवार यांनी स्पष्ट केले. आम्हाला लोकांनी विचारलं, काय भूमिका घ्यायची? देशात झालेला हा हल्ला पाहता या गोष्टींचा विचार करता येईल. काही चुका असतील-नसतील. हे नंतर पाहूया. आज सगळे एक होऊया, असेदेखील ही पवार म्हणाले. काही लोक याला धर्माचा रंग देतात, हे देशाच्या हितासाठी हानिकारक आहे, असेही पवार यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news