Purandar: पुरंदर तालुक्यातील धोकादायक गावांकडे दुर्लक्ष; उपाययोजना करण्याचे प्रांताधिकार्‍यांचे आदेश

संरक्षक जाळी बसविण्याची मागणी
Purandar News
पुरंदर तालुक्यातील धोकादायक गावांकडे दुर्लक्ष; उपाययोजना करण्याचे प्रांताधिकार्‍यांचे आदेशPudhari
Published on
Updated on

सासवड: माळीणच्या घटनेला 30 जुलैला 11 वर्षे पूर्ण होत आहेत. अशाच प्रकारे पुरंदर तालुक्यातील डोंगर उतारावर वसलेल्या 7 गावांतील वाड्या-वस्त्यांना धोका होऊ शकतो. यामुळे धोकादायक दरड पाडून संरक्षक जाळी बसविण्याची मागणी होत आहे.

किल्ले पुरंदरच्या पायथ्याशी वसलेली चिव्हेवाडी, बहिरवाडी, घेरा- पुरंदर, पानवडी, मिसाळवाडी, कोंडकेवाडी आदी गावे आहेत. या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस होतो. या ठिकाणी महादेव कोळींची वस्ती आहे. (Latest Pune News)

Purandar News
Crop loss in Ambegaon: सततच्या पावसाने खरीप हंगाम वाया; आंबेगावच्या पूर्व भागातील स्थिती

शासनाच्या वतीने धोकादायक गावे व वाड्या- वस्तीतील लोकांचे संभाव्य धोक्यापासून संरक्षण करणे आवश्यक आहे, असे कोंडकेवाडीचे सामाजिक कार्यकर्ते रोहिदास कोंडके व आदिवासी नेते गणेश मिसाळ यांनी सांगितले.

पुरंदरमध्ये मे महिन्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला, या अनुषंगाने तालुक्यामधील दरडप्रवण क्षेत्राची पहाणी करावी. अशा ठिकाणी रहाणार्‍या लोकांची जीवितहानी टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात, असे आदेश पुरंदरच्या प्रांताधिकारी वर्षा लांडगे यांनी संबंधितांना दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news