अवकाळी पावसामुळे भात खाचरांत पाणी साचल्याने उभी पिके जमीनदोस्त झाली आहेत. कापणी केलेले भातही भिजून वाया गेली आहेत. त्यामुळे तांदळाचे उत्पादन निम्म्याहून अधिक घटणार आहे. सरकारने याची दखल घेऊन शेतकर्यांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी.– तानाजी मांगडे,उपाध्यक्ष, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस.अवकाळी पावसामुळे पानशेत, राजगड भागांसह तालुक्यात भात पिकांचे नुकसान झाले आहे. त्याची तातडीने पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना महसूल अधिकारी, कर्मचारी तसेच कृषी विभागाला दिल्या आहेत.– दिनेश पारगे,
तहसीलदार, वेल्हे तालुका.