माजी लोकप्रतिनिधी ज्ञानेश्वर कटके, अनिल सातव पाटील यांनी पाणी काढण्यासाठी प्रयत्न केले. परंतु महापालिका प्रशासनाला याबाबत वारंवार कळवूनदेखील दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला. ग्रामपंचायत असताना पंप चालू-बंद करण्यासाठी कर्मचारी होता. परंतु, सध्यस्थितीत हे काम नागरिकांनाच करावे लागत आहे. दर गुरुवारी विद्युतपुरवठा खंडित केला जातो, त्यादिवशीसुद्धा अशाच परिस्थितीचा सामना येथील रहिवाशांना करावा लागतो. बोअरवेलमध्येसुद्धा ड्रेनेजचे पाणी पाझरल्याने त्यातून येणारे पाणीदेखील वापरण्याजोगे राहिले नाही. त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी